किती पायी लागू तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.
काय गा म्यां पामराने
खरडावी बाराखडी;
आणि बोलावी उत्तरें
टिनपाट वा चोमडी.
खरडावी बाराखडी;
आणि बोलावी उत्तरें
टिनपाट वा चोमडी.
कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !
तुझे माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा